सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला
मुंबई: सीएए-एनआरसीच्या वेळेस देशभरात दंगली झाल्या. पण महाराष्ट्रात झाल्या नाहीत. मुस्लिम बांधवही सोबत आले. या सगळ्याला कारण तुम्ही आहात. पण हे चांगलेही कोणाला बघवलं नाही. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबूक LIVE च्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
मी आश्वस्त केले होते, जे सुरु केलय ते सुरू राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने केली आहे. सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आयुष्य सार्थकी लागले संभाजीनगर नामकरण आज दिले शिवाय उस्मानाबादचे धाराशिव. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. पवारसाहेब, सोनियाजी सहकार्याना धन्यवाद. चारच शिवसेनेची मंत्री आज होते कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन केले आहे.” यावेळी त्यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे आभार मानले.
ते पुढे म्हणाले, “माणसं मोठी झाली. ज्याने मोठं केलं त्यांनाच विसरायला लागली. सत्ता आल्यानंतर सगळं दिलं. ती लोकं नाराज झाली. मी मातोश्रीला आल्यानंतर साधी साधी लोक माझ्याकडे येत आहेत. ज्यांना दिले ते नाराज, ज्यांना दिले नाही ते सोबत आहेत.
आज सुद्धा न्यायदेवतेने निकाल दिला आहे. तरीसुद्धा उद्या बहुमत चाचणी करण्याचा आदेश दिला आहे. राज्यपाल महोदयांना ही धन्यवाद द्यायचे आहेत.”
“आम्हाला फ्लोर टेस्ट करायला सांगितली. विधान परिषदेच्या आमदारांची यादीला मंजुरी दिली तर फार बरं होईल” असा टोमणाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
काल मी आवाहन केले. जे नाराज आहेत, ती नेमकी आहे कोणावर? आपली जी नाराजी आहे ती आपल्या हक्काच्या घरात का सांगितली नाही. तुमच्या भावनांचा मी आदर करत आलो आहे.
ज्यांना आपले मानले त्यांच्याशी काय लढाया करायच्या. अनेक सैनिकांना स्थानबद्ध केले आहे. चीन सीमेवरचे संरक्षण सुद्धा काढून इथे आणण्यात येईल जो गुलाल उधळला तिथे रक्ताचे पाट उधळणार का, तुमच्या मार्गात कोणीही येणार नाही. उद्या बहुमत चाचणी आहे. माझ्या बाजूने किती आहे किती विरोधात आहेत. याने मला फरक पडत नाही.
मला तो खेळच खेळायचा नाही. ज्यांना शिवसेनेने जन्म दिला त्या शिवसेना पुत्राला पदावरून खाली खेचण्याचे पुण्य पदरात पडत असेल तर पडू द्या.
मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाही. आम्ही अजिबात हपापत नाही. आम्ही सगळं हिंदूसाठी करतो. आज मी सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.”
शिवसेना आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मी माझ्या विधान परिषदेच्या आमदारकीचा ही राजीनामा देत आहे.
मी शिवसैनिकांना सांगतोय त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला सत्तेवरून खेचले याचे पेढे त्यांना वाटू द्या. त्यांचा गोडवा त्यांना लखलाभ…मला तुमच्या प्रेमाचा गोडवा हवा आहे.