मुख्यधिकारी डॉ विजय देशमुख यांच्या कामांची प्रशंसा.. आता जनसामान्यांचे प्रश्न सुटणार !
वाड़ी (विजय खवसे)
वाड़ी नगर परिषद होवून सात वर्ष लोटले येथे दोन मुख्यधिकारी येवून गेले तीसरे डॉ. विजय देशमुख हे आले.विजय देशमुख यांना महानगर पालिका प्रशासनाचा तसा गाड़ा अभ्यास…बस त्याचाच फायदा वाड़ी नप ला कसा देता येईल असाच मानस देशमुख यांचा आहे.
देशमुख 4 फरवरी 22 ला जॉइन होताच पहिल्या दिवसा पासून त्यांनी जनतेच्या समस्या कड़े लक्ष दिले.नेता,कार्यकर्ता किंवा सर्व सामान्य माणसाला सुद्धा त्यांच्या कडून नक्कीच समाधान मिळते.त्यांचा स्वभाव तसा मनमिळावू…कर्मचारी वर्ग असो की कन्त्राटदार कोणावरहि राग काढून काम करून घेत नाही त्या मुळे त्यांच्यावर कर्मचारी ही खुश आहेत.जनतेला वाड़ी चा विकास हवा…आता तसा अधिकारी मिळाला असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल यांनी सोशल मीडिया वर व्यक्त केले.
पारखी यांनी त्यांच्याच भाषेत लिहलेले पत्र वाचा..!
मा श्री विजयजी देशमुख साहेब नप वाडीला लाभलेले प्रामाणिक कर्तबगार मुख्यधीकारी
——————————————
न प वाडी मुख्यधिकरी मा विजयजी देशमुख साहेब हे वाडीला मिळालेली आदर्श व्यक्ती आता पर्यंत असे व्यक्ती सी ओ मी तर बघितले नाही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांनी विषय समजउन घेतला आणि लगेच संमदित कर्मचाऱ्याणा बोलउन समास्या मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला .काही विषयाला वेळ लागेल परंतु विषय समजाउन सांगतात आज पर्यंत भरपूर सी ओ येऊन गेले पण असे शांत स्वभावाचे व कार्यशील व्यक्ती बघितली नाही .
त्यांना त्रास होणार नाही असे कृत्य कोणीही करू नये जनतेचे काही विषय असेल तर ते स्वाता प्रयत्न करून मार्गी लावतात आज पर्यंतचा अनुभव चांगल्या व्यक्तीची स्तुती केलीच पाहिजे म्हणून अशा कर्तबगार व्यक्तीला गमावू नका साहेब खूप चांगली व्यक्ती आहे.
मा विजय देशमुख साहेब वाडीला न प ला मिळालेले आदर्श व्यक्ती त्यांच्यां कार्याला सलाम असे व्यक्तिमत्व पुन्हा मिळनार नाही.
मी बरेच विषय त्यांच्या कडे घेऊन गेले काही विषय मार्गी लागले काही विषय काही कारणामुळे होत नाही याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती वाईट आहे वेळ लागेल पण मार्गी लावेल त्यांच्या वर माझा तरी विश्वास आहे त्यांचे बोलणे आणि वागणे हे जगावेगळे आहे
अनिल पारखी
मनसे तालुका अध्यक्ष नागपूर (ग्रामीण)


