सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

ऊर्जा खाते सक्षमपणे सांभाळण्याचे आणि नागपूरला कोरोनामुक्त करण्याचे मंत्री म्हणून समाधान – डॉ. नितीन राऊत

ऊर्जा खाते सक्षमपणे सांभाळण्याचे आणि नागपूरला कोरोनामुक्त करण्याचे मंत्री म्हणून समाधान – डॉ. नितीन राऊत

नागपूर : राज्याचा ऊर्जामंत्री म्हणून आणि नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने कोरोना काळात महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ संपूर्ण नागपूर जिल्ह्याला कोरोनामुक्त केले. याशिवाय एक लाख कर्मचारी व २६ कामगार संघटना असलेल्या ऊर्जासारख्या महत्वपूर्ण खात्याची जबाबदारी सांभाळताना कुठलेही आंदोलन होऊ दिले नाही, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन माजी ऊर्जामंत्री डॉ . नितीन राऊत यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

प्रेस क्लबमध्ये आयोजित “मीट द प्रेस” कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, मंडळाच्या तीनही कंपन्यांना नफ्यात आणण्यासाठी कामगारांना विश्वासात घेऊन नाविन्यपूर्ण काम केले. सौर ऊर्जा आणि हरित ऊर्जेला प्राधान्य देणाऱ्या महाऊर्जा कंपनीच्या कामाला गती दिली. केंद्रसरकारने ऊर्जा निर्मितीसाठी ठरवून दिलेले २७ हजार मेगावॅटचे लक्ष्य साध्य केले.

कोरोनाकाळात मीटर रिडींग घेतले जात नव्हते. त्यामुळे ३ महिन्यांचे सरासरी बिल पाठवण्यात आले होते. त्याकारणात्सव लोकांना वाढीव बिल आले होते. मात्र, तो विषय नंतर यशस्वीरीत्या सोडविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या कार्यकाळात विजेचे प्रती युनिट दर वाढू दिले नाहीत. मात्र, मधल्या काळात देशभरात कोळसा टंचाईचे भीषण संकट आले होते.

केंद्रसरकारने आम्हाला आयात कोळसा वापरून ऊर्जा निर्मिती करायला लावली. त्यासाठी लागणारा पैसा वसूल करण्यासाठी केंद्रानेच विजेचे दर निश्चित करणाऱ्या “एमईआरसी” संस्थेला विजेचे दर वाढविण्यास सांगितले. मात्र, तरीही वीज दरवाढीला विरोध करून एमईआरसीकडे आपण अपील केल्याचे स्पष्टीकरण डॉ. राऊत यांनी दिले.

कोरोनामुळे महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे वाया गेली. गेल्या सहा महिन्यांत प्रत्यक्ष विकास कामे खऱ्या अर्थाने सुरु झाली,पण सरकार कोसळले. मात्र, तरीही मंत्रीमंडळाच्या शेवटच्या बैठकीत विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाचा प्रस्ताव आणला. आता नव्या सरकारकडून विकास कामे केली जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ऊर्जामंत्री म्हणून डाव्होस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत सामील झालो. या परिषदेत सुमारे ५० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले. या कंपन्यांशी सामंजस्य करार करतानाच जमिनीचे आणि विजेचे करार केले असल्यामुळे हे उद्योग खात्रीने उभे राहतील, असा विश्वास माजी उर्जामंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी

महानिर्मिती,महावितरण,महापारेषण,महाऊर्जा विभाग तसेच नागपूर जिल्ह्यात केलेल्या उल्लेखनीय विकास कामांवर त्यांनी प्रकाश टाकला.

विशेष म्हणजे ही विकास कामे करताना अधिकारी,कर्मचारी, संघटना, विविध राजकीय पक्ष,माध्यमे, व्यापारी, समाजातील विविध घटक तसेच नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मिट द प्रेस घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रेस क्लबचे पदाधिकारी जोसेफ राव, प्रदीप मैत्र, ज्येष्ठ संपादक एस. एन विनोद आदी उपस्थित होते.

- Advertisment -