सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

रविभवनच्या सफाईवर होणार ७५ कोटींचा खर्च !

रविभवनच्या सफाईवर होणार ७५ कोटींचा खर्च !

नागपूर : यंदा हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (साबा) च्या वतीने शासकिय निवासस्थानांची रंगरंगोटी, सफाई करण्यात येणार आहे. एकट्या रविभवन परिसरातील इमारतींच्या रंगरंगोटी, साफसफाईवर ७५ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन नुकतेच मुंबई येथे संपुष्टात आले. यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशन हे १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला नागपुरात दोन वर्षानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशना संदर्भात सुचना दिल्या आहेत. त्याचेच औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी कामाला लागले आहेत.

रविभवन परिसरातील देवगिरी इमारतीच्या साफसफाई, रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे शासकिय निवासस्थान आहे. रविभवन परिसरातील इमारतींची दुरुस्ती, सफाई, रंगरंगोटीच्या कामाला’साबा’च्या वतीने ७५ कोटी खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्राने दिली. आमदार निवास, विधानभवन परिसराच्या साफसफाईवरही कोट्यावधींचा खर्च केला जाणार असल्याचे सुत्राने सांगितले. दोन वर्षानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होत असल्यामुळे आणि राज्यात सत्ता पालट झाल्यामुळे कोट्यावधींचा खर्च मंत्री, आमदार यांच्या निवासस्थानांच्या रंगरंगोटी व साफसफाईवर केला जाणार आहे. मंत्री महोद्य व आमदारांच्या शासकिय निवासस्थानी मात्र त्यांच्या चाहत्यांची मजा असते. मंत्री मात्र पंचतारांकित हॉटेल मध्ये थांबतात, हे विशेष.

नागपूर पॅक्टनुसार राज्यात तीन पैकी एक अधिवेशन नागपूरला घ्यावे लागते, पण महाविकासआघाडी सरकारला २०१९ नंतर नागपूरमध्ये अधिवेशन घेताच आले नाही. नागपूर पॅक्टचा सन्मान म्हणून यावर्षीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची मागणीही भाजपने केली होती, पण तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी प्रवासाला परवानगी दिली नव्हती, म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनही मुंबईमध्येच घेण्यात आले होते.

- Advertisment -