सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

हा देश प्रधानमंत्री मोदींचा नाही माझा देश आहे : संजय आवटे, लोकमत संपादक

हा देश प्रधानमंत्री मोदींचा नाही माझा देश आहे : संजय आवटे

‘आम्ही भारताचे लोक’विषयावर व्याख्यान

कामगार केसरी रूईकर स्मृति व्याख्यान-२०२२

नागपूर : भारताचे संविधान जगात नंबर वन चे संविधान आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान सर्वांसाठी समान आहे. लोकशाही पद्धत भारतात आहे. हा देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा नसून भारतात राहणाऱ्या समस्त नागरिकांचा हा देश आहे. भारतात हुकुमशाही नसून लोकशाही आहे. असे विचार पुणे लोकमत आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी मांडले.

आर. एस. रूईकर इंस्टिट्यूट ऑफ लेबर एन्ड सोशिओ-कल्चरल स्टडीजच्या वतीने रविवार १३ नोव्हेंबरला हिंदी मोर भवन येथील अर्पण सभागृहात कामगार केसरी रूईककर स्मृति व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आम्ही भारताचे लोक’या विषय होता. प्रमुख वक्ता म्हणून आवटे हे बोलत होते. विचार पिठाच्या अध्यक्षस्थानी आर. एस. रूईकर इंस्टिट्यूट चे संचालक अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. मंचावर कॉ. रमेश एन. पाटणे, डॉ. जी. एस. ख्वाजा, आर. एस. रूईकर इंस्टिट्यूट चे सचिव डॉ. गौतम कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान संजय आवटे यांचा सन्मान करण्यात आला. आवटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यांवर प्रकाश टाकला. आजच्या वर्तमान परिस्थितीवर चिंतन-मंथन करण्याची गरज असल्याचेही ते बोललेत. सध्या महाराष्ट्रात बाप पळविणारी टोळी सक्रिय असल्याचा टोला ही शिंदे-फडणवीस सरकारला संजय आवटे यांनी लगावला.

कार्यक्रमाचे संचालन अण्णासाहेब गुंड्डेवार महाविद्यालयाच्या प्रोफेसर व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंजूषा राजेंद्र ठाकरे यांनी केले. कामगार नेते विलास भोंगाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विचारवंत, लेखक, कवि आदी उपस्थित होते.

 

- Advertisment -