सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणात तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेप

बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणात तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेप

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा

नागपूर : बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणात नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी मानले आहे. या तिन्ही दोषींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. गणेश शाहू, अंकित शाहू आणि गुडिया शाहू अशी दोषी आरोपींची नावे आहेत.  

जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे डीजे १० श्री. एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयात कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यात सरकारतर्फे व आरोपी तर्फे अंतिम युक्तिवाद झाला होता. नागपूरचे क्राईम रिपोर्टर रविकांत कांबळे यांची आई आणि दीड वर्षांच्या मुलीची १७ फेब्रुवारी २०१८ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न करून एसीपी बनसोड कोतवाली यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते .युक्तीवादा दरम्यान विशेष सरकारी वकील श्री उज्वल निकम यांनी असे सांगितले होते की आरोपी विरुद्ध सरकार पक्षाने पुरावा कायद्याचे अनुषंगाने सबळ पुरावे कोर्टा समोर सिद्ध केले आहेत.

या प्रकरणात सरकारतर्फे एकूण ३५ साक्षीदार पडताळण्यात होते. युक्तीवादाचे मुख्य मुद्दे उज्वल निकम यांनी मांडले त्यात आरोपींच्या राहत्या घरात व त्यांच्या स्वतःच्या चार चाकी महेंद्र एक्सयूव्ही ५०० गाडीतून उषाबाई कांबळे व राशी कांबळे यांचे रक्ताचे डाग मिळून आले तसेच घरातून व गाडीतून मिळून आलेले रक्ताच्या डागाच्या नमुनाच्या अहवाल फॉरेन्सिक चाचणी मध्ये उषाबाई कांबळे यांचा डीएनए सोबत जुळून आल्याचे निष्पन्न झाले, असा सुद्धा युक्तिवाद करण्यात आला होता.

जसे की प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांनी आरोपी गणेश शाहू, अंकित शाहू, गुडिया शाहू यांना घटनेच्या दिवशी दुकानात पाहिले तसेच काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना दोन पोते आरोपीच्या घरच्या जिन्यावरून खाली उतरवून गाडीत टाकताना आणि त्यानंतर ते पोते विहिरगाव नाल्यात फेकताना साक्षीदारांनी पाहिले होते.

आरोपींनी खून करून पुरावा सुद्धा नष्ट केलेला आहे असा युक्तिवाद करण्यात आला होता. तसेच, मृतक उषाबाई कांबळे यांच्या अंगावरील दागिने हे आरोपी अंकितने अटक झाल्यानंतर लपवून ठेवलेल्या ठिकाणावरून काढून दिले होते हे सुद्धा साक्षीदारांच्या पुराव्यात कोर्टा समोर सिद्ध झालेले होते. असा युक्तिवाद करण्यात आला होता.

 

आरोपींकडून मृतक उषाबाई कांबळे यांचा मोबाईल व आरोपीने वापरलेले शस्त्र साक्षदारानच्या समक्ष आरोपी गणेशने फेकलेल्या ठिकाणावरून काढून दिले हे कोर्टा समोर साक्षीदारा मार्फत सिद्ध झाले होते. असा युक्तिवाद करण्यात आला तसेच सरकार पक्षाने डॉक्टरांचा वैद्यकीय अधिकारी यांच्या पुराव्याच्या आधारे जप्त शस्त्राद्वारे मृतांच्या शरीरावर जखमा होते शक्य आहे हे कोर्टा समोर सिद्ध केले असा युक्तिवाद करण्यात आला होता.

युक्तिवादाच्या अंतिम टप्प्यात विशेष सरकारी वकील श्री उज्वल निकम यांनी माननीय कोर्टाला असे सांगितले होते की सर्व आरोपींनी सूडबुद्धीने ,गुन्हेगारी कट रचून ,संगमतपने दिढ वर्षाच्या चिमुकली मुलीचा व तिच्या आजीचा गळा कापून निर्घृणपने खून करून त्यांचे प्रेत पोत्यात टाकून गाडीच्या माध्यमाने नाल्यात फेकले व पुरावा नष्ट केला. अखेर शुक्रवार १४ जुलै रोजी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आपला निर्णय सुनावत तिन्ही आरोपींना दोषी ठरवित त्यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisment -