संविधानाची 75 वर्ष, 75 तास, 75 अनुच्छेदावर 125 व्यक्तींची चर्चा
संविधान डिबेट वाचनचा ऐतिहासिक समारोप
नागपूर : भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याने त्याच्या हीरक महोत्सवा निमित्त संविधानातील 75 अनुच्छेदावर, 75 तास व 75 प्लस व्यक्तींच्या चर्चाचे आयोजन 23 मे ते 26 मे च्या दरम्यान नागपुरातील प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर मध्ये करण्यात आले होते. आज या ऐतिहासिक कार्यक्रमाचा समारोप प्रसिद्ध आंबेडकरी व संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा देविदास घोडेस्वार यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात मोठ्या जल्लोषात करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभाग, बार्टी प्रशासन व दिशा ह्यूमन वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. 75 व्यक्तींचे टारगेट असले तरी 125 व्यक्तींनी वाचनात सहभाग घेतला त्यामुळे एकेक अनुच्छेद दोन दोन व्यक्तींना वाचावा लागला हे विशेष.
भारतीय संविधानाच्या निर्मिती मागील वाद विवादावर व त्याच्या अनुच्छेदावर सलग 75 तास चर्चेचा देशातील हा प्रथमच कार्यक्रम होता. त्यामुळे या ऐतिहासिक कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ने सुद्धा नोंद घेण्यासाठी त्यांचे juri जज असलेले मनीष पाटील यांना प्रामुख्याने पाठवले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी शहरातील विविध संस्था, संघटना चे प्रतिनिधी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित झाले होते.
भारतीय संविधान बनविताना 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसाचा कालावधी लागला. त्या दरम्यान झालेल्या चर्चेचे केंद्र सरकारने इंग्रजी व हिंदीत कॉन्स्टिट्यूट असेंबली डिबेट्स प्रकाशित केले. त्या डिबेट्स चे मराठीत भाषांतर प्रा देविदास घोडेस्वार यांनी केले. या तिन्ही भाषेतील अनुच्छेदाच्या वादविवादाचे वाचन याप्रसंगी करण्यात आले.
या वाचनाच्या उपक्रमात बारा वर्षाच्या विद्यार्थ्यापासून तर सत्तर वर्षाच्या वयोवृद्धा पर्यंतच्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच वाचन मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत करण्यात आले. यात वकील, कॉलेज व अभ्यासिकेतील विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
प्रा देविदास घोडेस्वार यांनी राज्य व केंद्र शासनाच्या उदासीन धोरणाचा याप्रसंगी खरपूस समाचार घेतला. एवढेच नव्हे तर यांच्यापासूनच संविधानाला धोका असल्याने सर्वसामान्यांनी सामान्यांचे कवच कुंडल असलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येक सामान्यांनीच पुढे आलं पाहिजे असे आवाहन केले. एवढेच नव्हे तर संविधानाच्या मूळ प्रास्ताविकेत सुद्धा शासनकर्त्या तर्फे फेरफार व चुका करण्यात आल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्तपणे संविधान तज्ञ प्राध्यापक देविदास घोडेस्वार व कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वामन सोमवार व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन करण्यात आले